Posts

Showing posts from May, 2020

बारा नमनाची म्हणणी

Image
बारा नमनाची म्हणणी (ओळख नमन/खेळ्यांची) कोकणची लोककला म्हणून ओळख असलेल्या नमन-खेळ्यांची सुरूवात ही बारा/सोळा नमनाने होत असते. देवतांना या नमनातून वंदन केले जाते. ही वंदनं प्रत्येक गावानुसार वेगवेगळी असतात. मात्र पहिले नमन हे धरती मातेलाच असते, आणि दहावे नमन हे दशमुखी रावणाला असते. हे एक यात साम्य आढळून येते. यामध्ये पहिले नमन धरती मातेला असण्यामागे ठोस कारण आहे. नमन/खेळे ही प्रामुख्याने कोकणातील कुणबी समाजाने जोपासलेली लोककला. कुणबी समाज हा शेतकरी असल्याने त्याचे नाते धरणी मातेशी जवळचे आहे. साहजिकच नमनामध्ये पहिले नमन हे धरणी मातेलाच असते. दुसरी गोष्ट रावणाला नमन करण्याची.. रावण दुष्ट..रावण खलनायक.. रावणाने सीतेला पळविली.. ही रावणाची नकारात्मक बाजू असूनही रावणाला नमनात बारा नमनात स्थान मिळाले आहे, अनेकांना हे कोडे वाटते, आणि नव्या पिढीला खटकणारे वाटते. मात्र याबाबत नमन/खेळ्यातील बुजूर्ग रंगकर्मी जे सांगतात, ते विचार करायला लावणारे आहे.  सुंकाई नमन मंडळ, सडये या मंडळाचे रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी सांगितले की, इतिहास हा नेहमी विजयी होणार्‍याच्याच बाजूने लिहला जातो. रावण पराभूत