पहिली माळ: गलबतवाल्यांची सुकाय
पहिली माळ: गलबतवाल्यांची सुकाय अर्थात सुंकाई देवीची जन्मकथा रत्नागिरी शहरापासून 11 किमी.दूर आरे-वारे मार्गावर असलेल्या सडये-पिरंदवणे-वाडाजूनची ग्रामदेवता श्री सुंकाई मंदिराविषयी उद्धबोधक माहिती भक्तगण-वाचकांसाठी देत आहे. - अमोल पालये, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्याला विशाल समुद्र लाभला आहे, यामुळेच इथे प्राचीन काळापासून जलवाहतूकीला अनन्यसाधारण महत्व आहे. शिवकाळात जलवाहतुकीचा वापर व्यापार-उदिमासाठी वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला, आणि मोठमोठ्या व्यापार-वसाहती उदयाला आल्या. शिवकाळात कोकणात ‘गलबत वाहतूक’ व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला. गलबत म्हणजे काय? शिवकालीन गलबत म्हणजे शिडांचे मोठे जहाज. ज्याची साहित्य वाहून नेण्याची क्षमता 70 टन होती. त्याला वल्हवण्यसाठी 20 नाविक लागत. इतकी मोठी गलबते रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनारची गावे आणि त्यांना लागून असलेल्या खाड्या येथपर्यंत प्रवास करत आणि मालाची ने-आण करत. ही वाहतूक रत्नागिरी किनारपट्टीवरुन गुहागर-दाभोळ खाडी, दापोली-हर्णे बंदर, मंडणगड-बाणकोट खाडी अशी वाहतूक चालत असे. गलबताचा व्यवसाय करणारा वर्ग हा खारवी-आगरी-कोळी. हा समाज कायम समुद्र...