Posts

Showing posts from 2018

जाग

Image
प्र कल्पाच्या भूसंपादनाचा पहिलाच दिवस होता. श्रीपतला सुट्टी होती. रोज गुरं घेऊन जाणार्‍या बापाला आज बर्‍याच दिवसानंतर श्रीपतने सांगितलं, ‘‘म्हातार्‍या आज शेतावर तू नको जाव. माझी सुट्टी हाय, मी चाललंय...’’ बापाला जरा बरं वाटलं. खरेतर गुरे घेवून जायची त्याला इच्छाच नव्हती; पण ‘म्हातार्‍याला जर कळलं आज  जम्मनीची मापणी हाय तर म्हातारा  गोंधळ घालील. त्यात सारे गावकरी अक्षरश: संतापलेले. काहीतरी कंदाल होण्यापेक्षा आपणच शेतावर गेलेले बरे...’ या विचारानं श्रीपत शेतावर गेला. गावात वातावरण तापलेलं, आदल्या रात्री सार्‍या गावाची गावकी मध्यरात्रीपर्यंत चालू होती. गावकीत जोराची सनसनी झाली. उभ्या गावकीत प्रकल्पावरून आडवी फुट पडली. अर्धे गावकरी प्रकल्प नको म्हणून पेटून उठले होते, तर काही प्रकल्प हवा म्हणून पुटपुटत होते. त्यावरून वादावादीही झाली. जमिनी जाणार म्हणून ‘अरे’ ला ‘कारे’ करण्याइतपत वेळ आली. त्यामुळे आज नक्कीच काहीतरी कंदाल होणार याची श्रीपतला कल्पना आलीच होती. अगदी तस्संच झालं. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तब्बल सात-आठ गाड्या सारं रान तुडवीत गावठाणात घुसल्या... गावठाणात हा हा म्हणता बा

शेतकर्‍याचा पोर

Image
तां ब्यांच्या खालच्या वाडीत गावकर्‍यांची लगबग चालू होती. धर्मी तांबीनीकडे तर जेवायलाही पुरसत नव्हती. तीच्या उत्साहाला जणू उधाणच आलं होतं. वाडीचा सोना गावकार, तांब्यांची भावकी, गावाची गावकी अशा पुर्‍या वाडीला काल संध्याकाळीच आमंत्रण देवून झालं होतं. म्हातारी गौतमीच्या तंगड्यात ताकद नव्हती तरीसुध्दा ती विड्याचं सामान, नारळ-सुपारी अशा विधीच्या सामानाच्या गठड्या बांधण्यात गुुंतली होती. घरात नातसून येणार या कल्पनेने ती हरखूनच गेली होती. गौतमीच्या नातवाचं, धर्मीच्या लेकाचं आणि प्रगतीशिल युवा शेतकरी गुरु तांबेचं लग्न अखेर ठरलं होतं. जाधव मास्तरांचा काल सकाळी ‘पोरगी बघायला या...’ असा निरोप आला आणि दोघींच्याही डोक्यावरचं मणमणाचं ओझं हलकं झाल्यासारखं दोघींना वाटलं.  धर्मी निरोप आल्याआल्या पुरुष्या भटाकडे गेली. पोरगी बघण्यासाठी मुहूर्त मागितला, भटानं आजचीच गोरज मुहूर्ताची वेळ दिली. लगेच मुहूर्त मिळाल्याने धर्मीही खुश झाली. गावातल्या पोरांकरवी गावात धडाधड आमंत्रणं फिरली.. मानाची-पानाची जी ठिकाणं होती तिथं धर्मी स्वत: गेली. सकाळी सकाळी धर्मीनं गुरुला पेढे आणि खण आणायला बाजारात पाठविलं होतं, दुप

विडे ठेवण्याची परंपरा:एक चिंतन!

Image
विडे ठेवण्याची परंपरा: एक चिंतन! कोकणातल्या शेतकर्‍यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे. काय आहे ही परंपरा..? याचं हे मनोवेधक चिंतन.. कोकणातल्या (विशेषत: रत्नागिरीतल्या) शेतकर्‍यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे. नरक चतुर्दर्शीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो. तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते. अर्थात तो समृध्द बनलेला असतो, त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता, लोकोत्सव असतो. गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देवदिवाळीपासूनच सुरू होतात. नरक चतुर्दर्शीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. देवदिवाळीलाही ती आहे. मात्र देवदिवाळीच्या अभ्यंगस्नानाचा पहिला मान गोठ्यातल्या बैलाचा.. गायीचा! आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची, त्यांना तेल लावायचं. गोठा सारवायचा. तांदळाच्या पिठाच्या रांगोळ्या काढायच्या. गोठ्यात दिवे लावायचे. दिव्याने गुरांना ओवाळायचं. मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या..! स्वत: आधी दुसर्‍याचा विचार..जगाचा विचार.. विशेषत: आपल्या गुरा-ढोरांचा विचार शेतकर्‍यांशिवाय या जगात को

काजवा

(लघु पर्यावरणकथा) त्या अंधार्‍या घरात फक्त ते दोघेच रहायचे. एक तो निर्धन कवी, तर दुसरा स्वयंप्रकाशी काजवा. भयाण अंधारात जेव्हा कवीला घर खायला उठायचं, तेव्हा हाच काजवा आपल्या लुकलुकत्या तेजानं कवीचं मन रिझवायचा. मग कवीही त्याच्यावर सुरेख सुरेख कविता लिहायचा. राजाच्या भाटाप्रमाणे त्याची स्तुती गायचा.. दोघांची रिलेशनशिप मस्त जमली होती, पण कविच्या सुरेख सुरेख स्तुती कवितांनी काजव्याच्या डोक्यात हवा शिरू लागली. आणि तेथेच त्यांच्या अनोख्या रिलेशनशिपला सुरुंग लागला. काजवा उन्मत होऊ लागला. कवीला म्हणून लागला, ‘अरे कवड्या, किती हा तुझ्या घरात अंधार..? मी आहे म्हणून उजेड तरी पडतो! जर मी दुसरीकडे गेलो, तर कुठेतरी अंधारात चाचपडत आपटशील, आणि मरशील हो..’ कवी जोराने हसला. बोलला काहीच नाही. .. आणि एकेदिवशी कवीची चेष्ठा करून तो काजवा त्या अंधार्‍या घरातून बाहेर गेला. आता एका श्रीमंताच्या बंगल्यात शिरावं, आणि तिथल्या माणसाचं मन रिझवावं.. असा विचार करत तो एका अलिशान बंगल्यात शिरला. संध्याकाळची वेळ होती. काजवा मनातच म्हणत होता, ‘आता या बंगल्याला बघ, कसा झळाळून टाकतो!’ काजवा बंगल्यात शिरला तेव्ह

भुताची शिकार

Image
नव्वदच्या दशकाआधी कोकणातल्या वाड्या-वाड्यात, झाडा-पेडावर बर्‍याच संख्येनं भुता-खोतांचं राज्य होतं. गावची सीमा, गावचा सडा, गावची पांदळ, गावातली झाडून सगळी वडाची झाडं, पिंपळ, वाघबिळं, देवाधर्माची-भूतम्हारक्याची ठिकाणं, स्मशानं, चिंचेंची झाडं अगदी गावच्या कोपर्‍या कोपर्‍यानं गावागावातून भुतं सुखासमाधानानं नांदत होती. टिव्ही, मोबाईल फारसा नसलेल्या त्या काळात भुतांच्या गप्पा अतिशय चवीनं रंगत. कधी शाळेतल्या वर्गात.. कधी शेताच्या बांधावर.. कधी रात्रीच्या जेवणानंतर.. गप्पा जशा रंगत तशा त्या अधिक भयावह होत जात. त्यातही गंमत म्हणजे कालच्या रात्रीतल्या गोष्टीत भूत पांढर्‍या साडीतलं असेल तर लगेच दुसर्‍या रात्री त्याच गोष्टीत त्याच भुताला उलटे पाय फुटलेले असायचे..!  नव्वदच्या दशकानंतर कोकणातली भूतं फारच कमी होऊ लागली आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भीती कमी होऊ लागली. ही भीती कमी होण्यासाठी गाववाड्यातून बरेच बदल व्हावे लागले. पुर्वी गावात भुतांचे वसतीस्थान असणारे वटवृक्ष वृक्षतोडीमुळे संपले. गावात तेव्हा वीजही नव्हती. अख्खी रात्र रॉकेलच्या दिव्यावर घालवावी लागे. आता मात्र घराघरातून दिवे लागलेच.

मनोगत

Image
स.न.वि.वि. ‘गावकीच्या पारावर’ आपणां सर्व वाचक, हितचिंतकांचे हार्दिक स्वागत!  आजपर्यंत लिहता-लिहता आपणां सर्वांच्या ज्या शुभेच्छा मिळाल्या, त्याच शुभेच्छ्‌यांच्या जोरावर आज हे ब्लॉगच्या घरात पहिले पाऊल टाकत आहे. यानिमित्ताने प्रथमच ब्लॉगच्या माध्यमातून अवघ्या जगभरात पोहोचण्याची संधी मिळाली आहे. लहानपणापासूनच ग्रामीण जीवनाची साथसंगत लाभली. हे ग्रामीण जीवन जितकं मजेदार आणि वैविधतेनं नटलेलं आहे, तितकचं ते समस्यांनी वेढलेलं आहे. इथं एकमेकाविषयी कमालीचा जिव्हाळा आहे.. मायेचा उबारा आहे.. या जिव्हाळ्यामुळे इथला माणूस एकमेकांशी बांधला गेला आहे. इथं अज्ञान आहे.. रूढी आहेत.. परंपरा आहेत.. आणि त्यातही तो कमालीचा बांधला गेला आहे. हेच चित्र आयुष्याच्या उभारत्या टप्प्यावर माझ्याभोवती पिंगा घालू लागलं, आणि कागदावर उतरू लागलं. यथावकाश चाचपडत चाचपडत ग्रामीण कथा लेखनाचा प्रारंभ झाला.  आजपर्यंत मी लिहलेल्या सार्‍याच कथांची पार्श्‍वभूमी ग्रामीण आहे.. प्रत्येक कथेत एक गाव आहे.. गावात गावकर आहे.. कधी तो खलनायक आहे.. कधी तो गावाचा कर्ता कारभारी आहे.. विषेश म्हणजे सार्‍याच कथा ‘जिव्हाळा’, ‘आरती’, ‘व

गावकीच्या पारावरून..!

Image
नमस्कार मंडळी! गाव म्हटलं की गावात गावकी येते.. गावकी आली की गावकीचा पार हा आलाच. गावकीचा पार हे गावकर्‍याचं जणू तीर्थक्षेत्रचं आहे. गावातला प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी गावकीच्या पारावर चरणधुळ घालतोच. हा पार अत्यंत सार्वजनिक.. त्यामुळे त्याच्याठायी सार्‍यांना आसरा मिळतो. सबब तो दिवसच काय रात्रीचाही गजबजलेला असतो. गावातली प्रत्येक बित्तंबातमी या पारावर प्रथम येते, आणि वार्‍यासारखी गावात पसरते. प्रत्येक बातमीची या पारावर सपट परिवार महाचर्चेप्रमाणे सखोल चर्चा होते.. ते धागेदोरे.. सारे पुरावे.. यावर जोरदार घमासान.. आणि कुजबूज होत असते. गावाची सुख आणि दु:ख मांडणारा गावकीचा पार एक प्रतिनिधी आहे. गाव जाणून घ्यायचा तर आधी पारावर जायलाच हवं. गावात कोण आजारी आहे.. मग त्याच्या तब्बेतीत सुधारणा आहे काय..? याची बातमी सर्वात आधी मिळेल ती पारावरच! कुणाचं लग्न ठरतंय, आणि कोणाचं लग्न का मोडलं..? तेही सविस्तर ऐकायला मिळेल ते पारावरच! काल रात्री परबीनीकडे कोण आलं होतं..? आणि आज कोणाकडे बायांचं भजन आहे.. आणि उद्या कोणाकडे कोंबडा कापला जाणार आहे.. बबन आज शाळेत का गेला नाही..? नंदी गुरवीनीच्या घरात

पालकी जडावली

Image
हा तं काय झालं. ढोलताशाच्या दनक्यात आनी गंगीन रांगोलीनं काडलील्या सोनपावलांवर पाय टाकीत रवलनात म्हाराज रवलनाताचे पयल्या फलीचे मानकरी, आनी रवलनाताचे लय मोटे पुंजारी.. झिंगाटवाडीचे सरपंच तात्या गावकरांकडे पालकीतनं आलं. गंगीन पाय धुवून रवलनाताला घरात घेतलानं, सोता तात्यांनी पालकीला खांदा देलानी व्हता.  देव तात्यानंच्या घरात बसलंं. मंग सोता तात्या आनी गंगी गावकारीनं जोडयेनं पुंजा करया बसली. दोगावानी हात जोडलानी, आनी रवलनाताला ‘देवा बा रवलनाता, गुंडुंबा धावीची परिक्षा देताय. त्याला यास देस रं बा म्हाराजा..’ म्हनून गार्‍हानं घातलानी. नारल फोडलानी. पेढं वाटलानी. आनी मंग तात्यानंच्या खलात देव खेलया लागला.. आता तात्या मानकरी म्हनू तेंचेकडं रवलनात नाचतू, आमी साधमानूस. आमचीकडं फकस्त येतू, पावनाचार घेतू.. आनी जातू.. आसो. तं ता थोडाथोडाका नाय खेलतं. तात्या जोवपरयानं तेला जायाची परवानगी देत नाय. तोवपरयानं ता तितचं खेलत र्‍हानार.. आता तेला खेलवनार्‍यांची काय कमी नाय. ही झो गरदी. चाकरमनान्यांनंला तं काय सांगया नुको. आक्का दिस पन तं पालकी नाचवीत र्‍हातीलं. आता पालकी नाचवाय प्वारांनंला ज्वोर येया ह

डीजे

Image
स काळी घाई-घाईनेच कोपरेकरांकडे लग्नाचं देवक ठेवून झालं, सुटलो बुवा...! म्हणत बंड्या कोपरेकरांन जणू सुटकेचा श्‍वासच सोडला. बंड्याच्या लेकाचं- मन्याच लग्न आरंभलं होतं. सोमवारी साखरपुडा झाला आणि आज सकाळी देवक ठेवण्याचा कार्यक्रम पुर्‍या गावकीनं झटापटी पार पाडला... प्रसंगच तसा बाका कोपरेकरांच्या भावकीवर ओढवला होता. मन्याच्या लग्नाचा मुहूर्त आणि भावकीतल्या दिप्या कोपरेकराच्या गर्भार बायकोचे दिवस एका घटीकेलाच बहूधा भरणार होते. तशी कुणकुणच यजमान्याला आणि पूर्‍या गावकीला लागली होती. काल रात्रभर तीच्या पोटात कणकणत होतं. त्या कणकण्यानं यजमाननींच्या पोटात जास्तीच धास्ती उठली होती. खरेतर तीच्या नऊ महिन्यांचा विचार आधी कुणाच्या लक्षातच आला नव्हता; पण जेव्हा बोलबाला झाला तेव्हा मात्र यजमान्यासमोर लग्नावर ओढवणार्‍या सुवेराची चिंता गडद होवू लागली होती. अशावेळी बंड्याला काय करावे काही सुचत नव्हते. ऐन लग्नाच्या काळातच ती बाळंत झाली तर कोपरेकरांच्या भावकीवर सुवेर येणार आणि मग लग्न करता येणार नाही. सगळ्या आनंदाचा अक्षरश: विस्कोट होणार... पावणी रडत-कुडत राहणार... पोरांबाळांची, मुंबैकर चाकरमान्यांची मन

फुल परमिशन

Image
दु पारी बारा पंचावन्नचं लेक्चर संपल, आणि त्याला जरा हलकं वाटलं. तो बाहेर आला. गर्दीच्या कोलाहलात काही पोर चिंचेच्या झाडाखाली.. काही कॅन्टीनकडे... काही लायब्ररीकडे धावत होती. सकाळचं कॉलेज असल्याने त्याने काही खाल्लं नव्हंत. भूक चांगलीच लागली होती. त्यात सायकोच्या लेक्चरला त्याचं डोक मॅडमने पिकवलं होतं. तोच समोर त्याला त्याचा हरी दिसला. खरे त्याचे नाव सागर, पण त्याच्या बापाचे नाव श्रीहरी (कट्‌ट्यावर कुणीच कुणाला नावाने हाक मारत नाही, बापाचे नाव हीच एखाद्याची ओळख) सागर येताना कट्टयावर दिसला रे दिसला की एकच कोलाहल होतो,  ‘‘... दे रे हरी खाटल्यावरी... मग एकच खॅक... खॅक...’’  तो त्याच्याकडेच सरकला, सागर नुकताच आला होता. सेंट वगैरे मारून. याने छेडलं,  ‘‘काय रे काय विषेश... वाढदिवस परवा झाला...’’ ‘‘नाय रे सहजचं... झालं लेक्चरं...?’’ लेक्चरचं नाव काढताच तो वैतागला, ‘‘.. ऐला त्या सायकोच्या कॅटरीनाने डोकं खाल्लं यार... चल जावया कॅन्टीनमध्ये, वैंताग आला यार नुसता...’’  तो म्हणाला.‘‘... हं जा तू, आता बारा पंचावन्नचं लेक्चर संपलं ना, आता ती येईल, आमची अपॉमेंट ठरलेय...’’- सागर ‘‘ऐला खरचं...